Saturday, April 16, 2011

आठवण..

हताश मी बसलो होतो ..
मनामनातून खचलो होतो ..
सगळ्या गर्दीत एकटाच हरवलो होतो ..

मनी वाटले तुला पाहावे ..
पाखरांसवे उंच उडावे ..
तुझ्यासोबत पुन्हा जगावे ..

ढगांसंगे गाणे गावे ..
रुतुराजाचे येणे व्हावे..
वसंतात बहरून जावे..

मग अचानक कळले तू आता इथे नाही..

तुझे दिसणेही आता शक्य नाही..

असलेल्या आठवणीना कुरवाळत बसलो.. आणि एकटाच हसलो..

तेव्हा मात्र एकाच कळले..आता एकाच गोष्ट उरली आहे..

जगावे आठवणींच्या गावा ....!! 






1 comment:

Prajaktaa said...

Khupach chan kavita ahe re..mast..:) very touchy..